AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharmas 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा

16 डिसेंबरपासून खरमास महिना सुरू झाला आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमासही संपेल.

Kharmas 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा
Kharmas-
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 1:56 PM
Share

मुंंबई :  16 डिसेंबरपासून खरमास महिना सुरू झाला आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमासही संपेल. धनु राशीच्या प्रवेशाने सूर्याचा पृथ्वीवरील प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे दिवस लहान आणि रात्र मोठी होतात. यामुळे खरमास दरम्यान कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावर करण्यास मनाई करण्यात येत. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी खरमास महिना खूप चांगला मानला जातो. असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होते आणि पूजेचे फळ अनेक पटीने मिळते.

खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा 1. खरमास महिन्यात भगवान विष्णूची नियमित पूजा करा आणि त्यांना दररोज तुळशीच्या पानांसह खीर अर्पण करा.

2. या महिन्यात रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करण्याची सवय लावा. स्नानानंतर भगवान विष्णूंना केशराच्या दुधाने अभिषेक करा आणि भगवान विष्णूच्या ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा 11 वेळा जप करा.

3. पीपळाच्या झाडामध्ये श्रीकृष्णाने स्वतःचे रूप सांगितले आहे. त्यामुळे पीपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. या महिन्यात नियमितपणे पिंपळाच्या झाडाची पूजा करा.

4. खरमास काळात धार्मिक स्थळांवर स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पण जर तुम्ही नदीत स्नान करण्यासाठी कुठेही जाऊ शकत नसाल तर घरातील पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करा.

5. खरमास नवव्या तिथीला मुलींना अन्नदान करा. याशिवाय भुकेले लोक, प्राणी इत्यादींना अन्न करावे.

6. या महिन्यात हिवाळा असतो त्यामुळे शरीर गरम ठेवण्यासाठी या महिन्यात गहू, तांदूळ, जव आणि मूग डाळ, गूळ, तीळ, वाटाणा आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा

Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा

Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.