Navratri 2023 : नवरात्रीत कन्या पूजन आणि त्यांना भोजनदान करण्याला का आहे विशेष महत्त्व?

नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारीकांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. साधारणतः नवरात्री सुरू होताच अनेक जण कन्या पूजा (Kanya Puja) करण्यास सुरुवात करतात.

Navratri 2023 : नवरात्रीत कन्या पूजन आणि त्यांना भोजनदान करण्याला का आहे विशेष महत्त्व?
कन्या भोजनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 3:27 PM

मुंबई : रविवार, 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत असून महासप्तमी 21 ऑक्टोबर, शनिवारी, महाअष्टमी 22 ऑक्टोबर, रविवारी, महानवमी 23 ऑक्टोबर, सोमवार आणि विजयादशमी 24 ऑक्टोबर, मंगळवारी साजरी केली जाईल. नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारीकांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. साधारणतः नवरात्री सुरू होताच अनेक जण कन्या पूजा (Kanya Puja) करण्यास सुरुवात करतात, परंतु अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व मानले जात असले तरी बहुतेक लोकं सप्तमीपासून कुमारीका पूजा आणि भोजन करण्यास सुरुवात करतात. जे नवरात्रभर उपवास करतात ते दशमीच्या दिवशी मुलीला भोजनदान केल्यानंतरच पारण करतात. दोन ते दहा वर्षे वयोगटातील नऊ कुमारीकांना जेवायला बोलवायले पाहिजे. नऊ क्रमांकाच्या मागे देवीच्या नऊ रूपांचा अर्थ आहे.

अशी आहे धार्मिक मान्यता

1-दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा मानले जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. 2- नऊ वर्षाच्या मुलीला खरे तर दुर्गा म्हणतात, जिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो आणि सर्व कामे पूर्ण होतात. 3- आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात, तिची पूजा केल्याने वादविवादात विजय प्राप्त होतो. 4- सात वर्षांच्या मुलीचे रूप चंडिकेचे मानले जाते. चंडिकेची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते. 5- सहा वर्षांच्या मुलीला ज्ञान, विजय आणि राजयोग देणारी कालिकेचे रूप मानले जाते. 6- पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात आणि तिची पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होते. 7- चार वर्षांची मुलगी शुभ मानली जाते आणि तिच्या पूजेने कुटुंबाचे कल्याण होते. 8- तीन वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते आणि तिची पूजा केल्याने धनधान्य तसेच कुटुंबात सुख-समृद्धी येते. 9- दोन वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतात.

असे करा कन्या पूजा

मुलींना बोलावल्यानंतर प्रथम देवीची पूजा करा आणि कुमारीकांचे पाय धुवून त्यांना योग्य आसनावर बसवा. रक्षासूत्र म्हणजेच मौली धागा प्रत्येकीच्या मनगटावर बांधा. सर्व प्रथम देवीला नैवेद्य दाखवा आणि नंतर कुमारीकांना भोजनदान करा.

हे सुद्धा वाचा

शेवटी चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि सर्वांना भेटवस्तू द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.