AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: संघाबाहेर कोण जाणार? कॅप्टन कोहलीसाठी मुंबईकर खेळाडूचा बळी देणार?

तिसऱ्या कसोटीसाठी तो पात्र आहे. त्याला बाहेर ठेवलं, तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल" असं माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनाी म्हटलं आहे.

IND vs SA: संघाबाहेर कोण जाणार? कॅप्टन कोहलीसाठी मुंबईकर खेळाडूचा बळी देणार?
virat kohli
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 11:39 AM
Share

केपटाऊन: पाठिच्या दुखण्यामुळे विराट कोहली (Virat kohli) दुसऱ्या जोहान्सबर्ग कसोटीत खेळला नव्हता. विराट आता मैदानावर सराव करतोय. त्यामुळे तिसऱ्या केपटाऊन कसोटीत तो खेळू शकतो. पण विराट कोहली संघात परतला, तर त्याच्याजागी संघाबाहेर कोण जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) की हनुमा विहारी? (Hanuma Vihari) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रहाणे अपयशी ठरला. पण दुसऱ्याडावात त्याने अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्याबाजूला हनुमा विहारीने सुद्धा दोन्ही डावात चांगला खेळ दाखवला. अन्य फलंदाज फक्त हजेरीलावून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना तो खेळपट्टीवर उभा राहिला. त्यामुळे विराटसाठी कोण बाहेर जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. (Ajinkya Rahane or Hanuma Vihari Who Should Make Way For Virat Kohli in Playing XI For 3rd Test at Cape Town?)

तो भविष्य आहे

अनुभवामुळे अजिंक्य रहाणे अजून संघात टिकून आहे. पण हनुमा विहारी भविष्य आहे. त्यामुळे त्याला संधी द्यावी असे काही जणांचे मत आहे. “अजिंक्य रहाणेला आतापर्यंत भरपूर संधी मिळालीय, त्यामुळे हनुमा विहारी तिसऱ्या कसोटीसाठी पात्र आहे. त्याला बाहेर ठेवलं, तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल” असं माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनाी म्हटलं आहे.

हेड कोच राहुल द्रविड काय निर्णय घेणार?

दुसऱ्या डावात रहाणेने वेगाने धावा जमवल्या होत्या तर विहारीने संयम दाखवत दुसऱ्याडावात तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन धावा केल्या होत्या. त्यामुळे कोणाला वगळायचं? हा कोच राहुल द्रविडसाठी कठीण निर्णय असेल. विहारी कामचलावू गोलंदाजी सुद्धा करतो. ती सुद्धा त्याची एक जमेची बाजू आहे. राहुल द्रविड यांनी, वरिष्ठ खेळाडूंनीही वाट पाहिली होती, असे सांगून अप्रत्यक्षपणे अजिंक्य रहाणेची पाठराखण केली होती. आता उद्या ते काय निर्णय घेतात, ते पहावे लागेल.

संबंधित बातम्या: 

IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल U19 World Cup: 11 षटकार, 20 चौकार आणि 278 धावा… वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या युवा संघाने दाखवला पराक्रम मित्र धोनीसाठी धावून गेला जाडेजा, KKR ची बोलती केली बंद, IPL आरंभाआधीच सुरु झाली ठसन

(Ajinkya Rahane or Hanuma Vihari Who Should Make Way For Virat Kohli in Playing XI For 3rd Test at Cape Town?)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.