AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

Beekeeping | हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी पाच लाखांपर्यंतही उत्पन्न कमावू शकता.

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई
मधुमक्षिका पालन
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 7:33 AM
Share

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

शेतीला पूरक असणाऱ्या अशाच उद्योगांपैकी एक म्हणजे मधुमक्षिका पालन (Beekeeping Business). हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी पाच लाखांपर्यंतही उत्पन्न कमावू शकता.

मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय नेमका काय?

ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन हा अत्यंत फायद्याचा उद्योग ठरतो. शेतामधील जागेतच तुम्ही मधुमक्षिका पालनासाठीच्या पेट्या ठेवू शकता. मधमाशांमुळे पिकांचे परागीकरण चांगले होऊन शेतीचे उत्पादनही वाढण्याची शक्यता असते. मधुमक्षिका पालनासाठी तुम्हाला सरकारकडून अगदी 85 टक्क्यापर्यंत अनुदानही मिळू शकते.

मधुमक्षिका पालनातून किती उत्पन्न मिळेल?

तुम्ही किमान 10 पेट्या घेऊन मधुमक्षिका पालनाला सुरुवात करू शकता. जर प्रत्येक बॉक्समधून 40 किलो मध मिळाले तर 10 बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रतिकिलो 350 रुपये दराने 400 किलो मध विक्री केल्यास 1 लाख 40 हजार रुपये कमाई होते. प्रत्येक बॉक्सचा खर्च 3500 हजार रुपये येतो. याप्रमाणे 10 बॉक्सचा एकूण खर्च 35 हजार रुपये होतो. म्हणजे यातून तुम्हाला 1,05,000 रुपये फायदा होतो. मधमाशांच्या संख्येत वाढ होईल तसा हा व्यवसाय तीन पटीने वाढतो. वातावरण आणि इतर घटक पोषक असतील तर तुम्ही वर्षभरात 25 ते 30 पेट्यांच्या माध्यमातून मधाचे उत्पादन घेऊ शकता.

मधमाशी पालनाचे अर्थशास्त्र त्याच्या दर्जावर अवलंबून असते. प्रत्येक डब्यातून प्राप्त होणारे 50 किलो कच्चा मध 100 रुपये प्रति किलोच्या दराने विकला जातो. म्हणजेच प्रत्येक डब्यामागे तुम्हाला 5 हजार रुपये मिळकत होते. मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास प्रति महिना 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. जैविक मध चांगल्या किंमतीत बाजारात विकले जाते. एक किलो सेंद्रिय मधाचा दर 400 ते 700 रुपये आहे.

सरकारकडून आर्थिक मदत उपलब्ध

हा व्यवसाय सुरु करायचा असल्यास सरकारकडून हनी प्रोसेसिंग प्लान्टसाठी आर्थिक मदत मिळते. उद्योगासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 65 टक्के हिस्सा सरकारकडून कर्जाच्या स्वरुपात मिळतो. यासोबतच सरकारकडून 25 टक्के सबसिडीही मिळते. अशा प्रकारे व्यावसायिकाला केवळ 10 टक्के रक्कम गुंतवावी लागते. समजा, एकूण खर्च 24 लाख 50 हजार रुपये येत असेल तर 16 लाख रुपयाचे कर्ज मिळते. त्यानंतर सबसिडी 6 लाख रुपये मिळते. म्हणजे केवळ 2 लाख रुपये व्यावसायिकाला गुंतवणूक करायची आहे.

संबंधित बातम्या:

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.