AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो.

Budget 2022: निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूने चर्चा करा: पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 11:16 AM
Share

नवी दिल्ली: निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो. हे खरं आहे. पण निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प (Budget 2022) हा आपल्या वर्षभराचा लेखाजोखा असतो. त्यामुळे सर्व खासदारांनी संसदेत चर्चेत सहभागी व्हावे. चांगल्या हेतूने आणि चांगल्या मनाने चर्चा करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सर्व खासदारांना केलं. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मीडियाशी संबोधित करताना सर्व खासदारांना हे आवाहन केलं आहे. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील (india) लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. आज बजेट सत्र सुरू होत आहे. मी सर्वांचं देशातील सर्व खासदारांचं या बजेट सत्रात स्वागत करतो. आजच्या वैश्विक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. हे बजेट सत्र जगात फक्त भारताची आर्थिक प्रगती, भारतातील लसीकरण मोहीम, भारताने स्वत: तयार केलेली लस आदींबाबत संपूर्ण जगात विश्वास निर्माण करत आहे. या सत्रात खासदारांनी मांडलेलं त्यांचं म्हणणं, त्यांच्या चर्चाचे मुद्दे, मोकळ्या मनाने करण्यात आलेली चर्चा आदी गोष्टी वैश्विक प्रभावाची संधी होऊ शकते, असं मोदी म्हणाले.

मानवीय संवेदनेतून चर्चा व्हावी

या अधिवेशनात सर्व खासदार सर्व राजकीय पक्ष मोकळ्या मनाने उत्तम चर्चा करून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यात, गती देण्यास मदत करतील, अशी आशा करतो. वारंवार निवडणुकांमुळे अधिवेशनावर त्याचा परिणाम होतो आणि चर्चांवरही परिणाम होत असतो, हे खरं आहे. पण सर्व खासदारांना विनंती आहे की, निवडणुका आपल्या जागेवर आहेत. त्या येत जात राहतील. पण सभागृहात अर्थसंकल्पातून संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा मांडला जातो. त्यासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. आपण सर्व कटिबद्धतेने हे सत्र फलदायी बनवलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात आपण आर्थिक उंची गाठण्याची संधी मिळेल, असं त्यांन सांगितलं. या अधिवेशनात मुक्त चर्चा व्हावी, मानवीय संवेदनेतून चर्चा व्हावी, चांगल्या हेतूने चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करतील इकोनॉमिक सर्वे, GDP अनुमानावर लागल्या आहेत सर्वांच्या नजरा

BUDGET 2022 JOB SEEKER : विपुलच्या नोकरीच्या शोध संपेल ? काय आहेत नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.