AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नासाठी पठ्ठ्याने 80 हजार दिले, तरीही नवरी पळाली, पाण्याची बाटली आणायला सांगून गंडवलं !

उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने पैसे देवून एका तरुणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. पण ते लग्न फार कार टिकलं नाही. लग्नानंतर लगेच त्याची भामटी पत्नी बॅगेतील इतर पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली.

लग्नासाठी पठ्ठ्याने 80 हजार दिले, तरीही नवरी पळाली, पाण्याची बाटली आणायला सांगून गंडवलं !
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 7:53 PM
Share

लखनऊ : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठा आणि महत्त्वाचा क्षण असतो. पती-पत्नी हे नातं दोघांच्या विश्वासाने तयार होतं. याशिवाय नातं हे पैशांनी निर्माण होत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि माणुसकी दोन्ही खर्च करावे लागतात. पण उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने पैसे देवून एका तरुणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. पण ते लग्न फार कार टिकलं नाही. लग्नानंतर लगेच त्याची भामटी पत्नी बॅगेतील इतर पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. त्यामुळे नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबियांकडे आता पश्चात्तापाशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लग्नासाठी नवरीची अट

संबंधित घटना ही मैनपुरी बेवर पोलीस ठाणे हद्दीतील परौंखा गावात घडली. पीडित पतीचं राजू असं नाव आहे. राजूचं लग्न एका मध्यस्थीच्या हस्ते जमलं होतं. या मध्यस्तीने राजूच्या वडिलांपुढे लग्नासाठी एक अट ठेवली होती. मुलाचं लग्न करायचं असेल तर नवरीला 80 हजार रुपये द्यावे लागतील, असं मध्यस्थीने सांगितलं होतं. राजूचे वडील त्याच्यासाठी अनेक दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होते. पण लग्नासाठी योग्य मुलगी मिळत नसल्याने त्यांनी अखेर मध्यस्थीच्या अटीला होकार दिला. नवरीला 80 हजार देवून आपल्या मुलांचा संसार सुरु होईल, अशी त्यांना आशा होती. पण भलतंच काहितरी वेगळं घडलं.

नवरदेवाच्या वडिलांनी नवरीला 80 हजार दिले

राजूच्या वडिलांनी नवरीला 80 हजार रुपये दिले. त्यानंतर 17 ऑगस्टला राजूचं संबंधित मुलीसोबत लग्न लागलं. विशेष म्हणजे नवरदेवाच्या कुटुंबियांनी नवरीला कपडे, दागिने आणि अनेक उपहार दिले. लग्नानंतर राजू पत्नीला घेऊन आपल्या घरी परौंखा गावाच्या दिशेला निघाला. यादरम्यान बस स्टँडवर नवरीने राजूकडून पिण्याच्या पाण्याची बाटली आणायला सांगितली. नवरदेव राजू पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात गेला तेवढ्या नवरी सर्व पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. राजूने आपल्या नवरीला शोधलं पण तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता.

पीडित नवरदेवाची पोलिसात तक्रार

अखेर आपण लुबाडलो गेलो याची जाणीव राजू आणि त्याचे पिता राजेंद्र यांना झाली. त्यांनी पोलीस ठाण्यात जावून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याची सर्व बाजू ऐकून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

नंदुरबारमध्येही एका नवरीनं 13 मुलांना फसवलं, अखेर पोलिसांकडून बेड्या

काही महिन्यांपूर्वी नंदुरबारमध्येही असाच काहिसा प्रकार समोर आला होता. आरोपी सोनू नावाच्या मुलीने तब्बल 13 मुलांना फसवलं होतं. तिने तेराही जणांशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना चिक्कार लुटलं. नंतर पळून गेली. विशेष म्हणजे ती एकटी नाही तर तिच्यापाठीमागे एक मोठी टोळीच असल्याचं समोर आलं होतं. या टोळीचं नावच सोनू असं होतं. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. मे महिन्यात तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं उघड झालं होतं.

हेही वाचा :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.