AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Assembly Election 2022: काँग्रेसचा युथ मॅनिफेस्टो, 20 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील 20 लाख तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

UP Assembly Election 2022: काँग्रेसचा युथ मॅनिफेस्टो, 20 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
Rahul Gandhi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 1:13 PM
Share

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील 20 लाख तरुण-तरुणींना नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला आणि तरुणांवर अधिक फोकस करण्यात आल्याने या जाहीरनाम्याला युथ मेनिफेस्टो म्हणून संबोधण्यात आलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा जाहीर केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही हा युथ मॅनिफेस्टो जाहीर करत आहोत. आम्ही उत्तर प्रदेशातील तरुणां कशा प्रकारे रोजगार देणार आहोत, हे या निवडणूक घोषणापत्रात नमूद केलं आहे. पक्षाने उत्तर प्रदेशातील तरुणांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना या जाहीरनाम्यातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, नोकऱ्या खरंच मिळाल्या का हे तुम्ही पाहातच आहात, असं राहुल गांधी म्हणाले.

20 लाख नोकऱ्यांची हमी

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावेळी संवाद साधला. उत्तर प्रदेशातील तरुणांशी संवाद साधून हा निवडणूक जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. आमच्या टीमने उत्तर प्रदेशातील एकूण एक तरुणांशी चर्चा केली आहे. यात भरती विधान असा शब्द प्रयोग केला आहे. कारण सर्वात मोठी समस्या भरतीची आहे. पण आम्ही 20 लाख नोकऱ्या देणार. तरुणांचा उत्साह मावळला आहे. त्यामुळे तरुणांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं प्रियंका म्हणाल्या.

रिक्त पदे भरणार

या भरती विधानमध्ये पाच सेक्शन आहेत. त्यात तरुणांच्या विविध समस्यांवर फोकस करण्यात आला आहे. प्राथमिक विद्यालयातील 1.5 लाख पदे खाली आहेत. ती भरली जातील. माध्यमिक, उच्च माध्यमिक, पोलीस आदी विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. संस्कृत शिक्षक, उर्दूचे शिक्षक, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका आदी रिक्त पदे भरली जातील. तरुणांनी मोठ्याप्रमाणावर अर्ज करावा आणि नोकरी मिळण्याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हावा म्हणून परीक्षेचे फॉर्म नि:शुल्क करण्यात येईल. परीक्षेसाठी बस आणि ट्रेनमधील प्रवास मोफत करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

आठ आश्वासने

परीक्षार्थींना रेल्वे, बसमधून मोफत प्रवास 8 लाख सरकारी पदांवर महिलांची भरती करणार 20 लाख सरकारी नोकऱ्यांची हमी शिक्षकांची दीड लाख रिक्त पदे भरणार जॉब कॅलेंडर तयार करणार, पेपर, जॉयनिंगची तारीख ठरवणार 30 वर्षाखालील नवउद्योजकांना प्रोत्साहन देणार सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करणार सीड स्टार्टअफ फंडासाठी 5 हजार कोटींची तरतूद करणार

संबंधित बातम्या:

Uttar Pradesh Election: मुलायम सिंह यादव जिथे शिकले, नोकरीला लागले तिथूनच अखिलेश यादव लढणार; अखेर सस्पेन्स संपला!

Uttar pradesh assembly election 2022: फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार नाही, सेफ मतदारसंघातून लढणार; उपमुख्यमंत्री मोर्य सिराथूमधून मैदानात

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.