AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Takatak 2: मराठीतल्या बोल्ड चित्रपटाचा सीक्वेल लवकरच; प्रथमेश परबचा ‘टकाटक 2’ येतोय

'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक 2'देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील धमाल-मस्ती यात नक्कीच असेल.

Takatak 2: मराठीतल्या बोल्ड चित्रपटाचा सीक्वेल लवकरच; प्रथमेश परबचा 'टकाटक 2' येतोय
मराठीतल्या बोल्ड चित्रपटाचा सीक्वेल लवकरचImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 3:13 PM
Share

‘टकाटक’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता त्याचा सीक्वेल म्हणजेच ‘टकाटक 2’ (Takatak 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. पहिल्या भागाचं कथानक आणि त्या माध्यमातून दिलेला संदेश तरुणाईपासून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता ‘टकाटक 2’मध्ये काय पहायला मिळणार याची उत्सुकता आहे. ‘टकाटक 2’मध्ये प्रथमेश परब (Prathamesh Parab) पुन्हा एकदा मिलिंद कवडे (Milind Kavde) यांच्या चित्रपटाचा नायक बनला आहे. त्याच्यासोबत अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत.

‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक 2’देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं असल्यानं गोव्यातील धमाल-मस्ती यात नक्कीच असेल. ‘टकाटक 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना ‘टकाटक’च्या एक पाऊल पुढे घेऊन जाणारा असल्याचं मिलिंद कवडे यांचं म्हणणं आहे. ‘टकाटक 2’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

प्रथमेश परबची इन्स्टा पोस्ट-

‘टकाटक 2’ची संकल्पना, कथा आणि पटकथा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांची आहे. तरुणाईला आवडेल असं संवादलेखन करण्याची जबाबदारी किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी पार पाडली आहे. गीतलेखन जय अत्रेनं केलं असून, संगीतकार वरूण लिखतेनं संगीत दिलं आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.