AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satyavan Savitri: ‘सत्यवान सावित्री’ मालिकेत ‘हा’ अभिनेता साकारणार सत्यवानाची भूमिका

आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पहायला मिळणार आहे.

Satyavan Savitri: 'सत्यवान सावित्री' मालिकेत 'हा' अभिनेता साकारणार सत्यवानाची भूमिका
Satyavan SavitriImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 7:45 AM
Share

गोष्ट अशा प्रेमाची ज्याच्यापुढे ‘मृत्यू’ ही हरला. नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ (Satyavan Savitri) लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संयमी, सौम्य आणि शूर जंगलपुत्र अशी ‘सत्यवान’ (Satyavan) यांची भूमिका अभिनेता आदित्य दुर्वे (Aditya Durve) साकारणार आहे. ही मालिका 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आदित्यची ही पहिलीच पौराणिक मालिका असून यातील भूमिकाही आदित्यसाठी आव्हानात्मक आहे. आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पहायला मिळणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, “पौराणिक मालिकेत काम करणं हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. मी याबद्दल कधी विचार नव्हता केला. पण ऑडिशननंतर जेव्हा मालिकेत माझी निवड झाल्याचं मला कळलं तेव्हा मी आनंदी होतो आणि त्याच सोबत नर्व्हसदेखील होतो. सगळ्या टीमने माझी खूप मदत केली आहे. या मालिकेत एक वेगळीच बोलीभाषा ऐकायला मिळेल. जेव्हा मी ती पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला देखील ती खूप गोड वाटली. पण बोलताना ती खूपच आव्हानात्मक आहे. ती भाषा बोलण्यासाठी सोपी होण्यासाठी मला 10 ते 15 दिवसांचा सराव करावा लागला. सत्यवान हा एक लाकूडतोड्या होता त्यामुळे त्याची शरीरयष्टी कशी असेल याचा विचार करून मी माझ्या देहबोली आणि शरीरयष्टीवर देखील लक्ष दिला. जेव्हा प्रेक्षक या मालिकेचा पहिला भाग पाहतील तेव्हा त्यांच्या मनात असलेली सत्यवानाची प्रतिमा मी छोट्या पडद्यावर साकारली असेन अशी मला आशा आहे.”

या भूमिकेमुळे आदित्यमध्ये झालेले बदल याबद्दल सांगताना आदित्य म्हणाला, “कुठली भूमिका साकारताना त्या भूमिकेतील काही गुण हे आपल्यात येतात. सत्यवानाने कुठलीही गोष्ट एकदा ठरवली तर ती पूर्णत्वाला नेतो. सत्यवान हा सगळ्यांची काळजी घेणारा आहे. तसेच सत्यवानामधला सगळ्यात मोठा गुण म्हणजे ऐकीव गोष्टींवर नाही तर जे दिसतं त्याची खात्री करून सत्यवान गोष्टींवर विश्वास ठेवतो. हे सगळे गुण माझ्यामध्ये देखील हळूहळू आत्मसात होत आहेत.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.