AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango Myths : आंबा कुणी खावा कुणी खाऊ नये? आंब्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी वाचा…

आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायेदशीर असते. बरेच लोक आंबा खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट बघत असतात.

Mango Myths : आंबा कुणी खावा कुणी खाऊ नये? आंब्याशी संबंधित 'या' खास गोष्टी वाचा...
आंबा
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायेदशीर आहे. बरेच लोक आंबा खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट बघतात. आंब्याला फळांचा राजा म्हटंले जाते. आंब्यात अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. आंबे लज्जतदार आणि चवदार असतात, ज्यांची चव प्रत्येकाला आवडते. बरेच लोक वजन वाढते म्हणून आंबे खाणे टाळतात. मात्र खरोखरच आंबा खाण्याने वजन वाढते का? हे आज आपण बघणार आहोत. (Eating mango is very beneficial for health)

खरोखरच आंब्याने वजन वाढते?

आंबा सोडियममुक्त आणि कोलेस्ट्रॉलमुक्त असतो, जे खाल्ल्याने वजन वाढत नाही. मात्र, बऱ्याच लोकांना आंबा खाल्ल्याने वजन वाढते असे वाटते. आंब्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, बी 6, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर असते. आंबा हे आरोग्यदायी फळांमध्ये येते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे फळ आरामात खाऊ शकता.

आंबा त्वचेसाठी फायदेशीर 

आंब्यात अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचे कार्य करतात. हे शरीरातील रॅडिकल्स देखील काढून टाकते. आंबा शरीरातून सर्व विषारी गोष्टी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे आंबा त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

मधुमेहाचे रूग्ण

55 पेक्षा कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असलेले आंबा हे एक गोड फळ आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे चांगले आहे. म्हणून मधुमेह असलेले लोक दिवसातून एक आंबा खाऊ शकतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

गर्भवती महिला

बऱ्याच गर्भवती महिला आंबा खाणे टाळतात. कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते. मात्र, डॉक्टर गरोदरपणात आंबे खाण्याचा सल्ला देतात. आंबा खाणे गर्भवती महिलांसाठी देखील चांगले आहे. मात्र, कोणत्याही गोष्टीचे प्रमाणाबाहेर सेवन करणे चुकीचे आहे.

हेही वाचा

1. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.

2. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.

3. आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.

4. फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Eating mango is very beneficial for health)

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.