AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख

पालिकेकडून 'आर-मध्य' बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख
नागपुरात आज पाणीबाणीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 7:00 AM
Share

दहिसर (Dahisar), बोरिवलीच्या (Borivali) काही भागात 5 मे रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून 6 मे रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पालिकेकडून ‘आर-मध्य’ बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईनचं काम सुरू असताना ‘आर-मध्य’ विभागातील चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा आणि संपूर्ण बोरिवली पश्चिममध्ये 6 मे रोजी संध्याकाळी 7.10 ते रात्री 9.40 आणि सकाळी 11.50 ते दुपारी 1.50 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. ‘आर उत्तर’ विभागातील एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गाव, कांदरपाडा, लिंक रोड आणि संपूर्ण दहिसर पश्चिम विभागात रात्री 9.40 ते रात्री 11.55 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

राज्यात पाणीटंचाईची भीती

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून 27 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या केवळ 44 टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. मुंबईतील धरणांत 27 टक्के तर ठाणे जिल्ह्यातील धरणांत 45 टक्के पाणीसाठा उरला आहे. वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत या साठ्यात आणखी घट झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

2 मार्चला राज्यातील धरणांमध्ये 71 टक्के पाणीसाठा होता. 15 दिवसांपूर्वी राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या पुणे विभागात सध्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणी शिल्लक आहे. तापमानवाढीपुढे येत्या काही दिवसांत इतर विभागातील धरणांमधील जलसाठ्यावरही परिणाम होऊ शकतो.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उल्हास नदीची पाणी पातळीही समाधानकारक आहे. असं असूनही वितरण व्यवस्थेतील दोषामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक शहरांसह नवी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवतेय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.