AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानाचा थेट अर्थच सांगितला आहे. (some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 10:54 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानाचा थेट अर्थच सांगितला आहे. कुणी तरी आहे तिथे. त्यांना इथे यायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे. अनेकजण आमच्याकडे येऊ इच्छित आहे. त्यासाठीचं हे विधान होतं, असं सांगत संजय राऊत यांनी धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे भाजपमधील कोण नेते महाविकास आघाडीत येणार या विषयीचे तर्कवितर्क लढवले जात आहे. (some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं. ठाकरेंची स्वत:ची स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये ते बोलले. नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल आणि आम्ही या सरकारमधून बाहेर पडू असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ज्यांना आमचे भावी सहकारी व्हायचं आहे, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातील काही लोकांकडे त्यांनी बोट दाखवून आणि नाव घेऊन त्यांनी विधान केलं. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत… विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी मला माजी म्हणू नका म्हणून सांगितलं त्या त्या बाबतच्याच हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहे. कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी संकेत दिले. तुम्ही या. बरेच लोकं येऊ इच्छित आहेत. येतीलच आता. चंद्रकांतदादाच म्हणाले 72 तास थांबा म्हणून. काही लोकांनी लगेच पतंग उडवण्यास सुरुवात केली. उडवू द्या. पतंगवर जाते आणि कापली जाते. येईल नंतर खाली, असा चिमटा राऊत यांनी काढला.

शिवसेना शब्द मोडत नाही

पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची. आम्ही त्याच मार्गाने जात असतो. त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसवावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

काल जिथे बोलले, तिथेच ते विधान संपलं

आता काही होणार नाही आणि कोणी होऊ देणार. भाजपच्या काही लोकांनी शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करणार असल्याची भाषा केली. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची धमकी दिली, अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. हे त्यांचं कल्चर आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार? युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचं चांगलं चाललंय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपले, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर फडणवीसांच्याही घरी जाईल

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचं कारण नाही. ते दोघेही त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही सोबत बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावंसं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन. एकमेकांचं तोंडच पाहायचं नाही, एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे चालत नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही झुकणार नाही

विधानसभेत आम्ही एकत्र आहोत. लोकल लेव्हला भाजपसोबत जाणं ही लोकांशी गद्दारी ठरेल. औरंगाबादमध्ये धर्मांध शक्ती थोपवायला आम्ही तिघे समर्थ आहोत. तसं नसतं तर दोन वर्ष सरकार सुरळीत चाललं नसतं. तिन्ही पक्षात सर्वकाही अलबेल आहे. कुणाच्या मनात किंतू परंतु नाही. या सरकारला नोव्हेंबरमध्ये दोन वर्ष होत आहे. पुढील तीन वर्ष सुद्धा अधिक गतिमान पद्धतीने हे सरकार चालेल. याबद्दल विरोधी पक्षांनी खात्री बाळगावी, असं सांगतानाच. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही गुडघे टेकू, सरेंडर होऊ आणि त्यांना हवं ते करू देऊ असं काही लोकांना वाटत आहे. हा कचरा कुणाच्या डोक्यात असेल तर तो तसाच ठेवा आम्ही झुकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

सह्याद्री गेस्ट हाऊस आणि राजभवनाजवळ वाझेकडून देशमुखांच्या सचिवाला पैशाने भरलेल्या 16 बॅगा; आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचंय त्यांनी खुशाल यावं; आता संजय राऊतांची विरोधकांना खुली ऑफर

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

(some opposition leader will join maha vikas aghadi, says sanjay raut)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.