AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: समीर वानखेडेंपासून जीवाला धोका, संरक्षण द्या; प्रभाकर साईल पोलीस मुख्यालयात

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंपासून आपल्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण द्या, अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली आहे.

VIDEO: समीर वानखेडेंपासून जीवाला धोका, संरक्षण द्या; प्रभाकर साईल पोलीस मुख्यालयात
प्रभाकर साईल
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 12:24 PM
Share

विनायक डावरुंग, गिरीश गायकवाड, मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंपासून आपल्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण द्या, अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली आहे. साईल यांनी संरक्षण मिळावं म्हणून पोलीस आयुक्तालयात धावही घेतली आहे.

एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचा भांडाफोड केला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर होते. कालही त्यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.

साईलची मागणी काय?

समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. कुटुंबीयांनाही धोका आहे. त्यामुळे मला संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी साईल यांनी केली होती. साईल यांनी आज सव्वा अकरा वाजता थेट पोलीस मुख्यालय गाठलं. पोलीस मुख्यालयात क्राईम ब्राँचचे प्रमुख मिलिंद भांबरे यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सोबत एक निवेदनही आणलं असून आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच क्रुझवरील रेडपूर्वी आणि नंतर काय काय घडलं याची माहितीही ते पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रभाकर आमच्या संपर्कात नाही

दरम्यान, प्रभाकर गेल्या चार महिन्यांपासून आमच्यासोबत राहत नाही. प्रभाकर अंगरक्षक म्हणून काम करतो. तो गेल्या 4 महिन्यांपासून आमच्या संपर्कात नाही, प्रभाकर घरात पैसेही देत नाही, असं प्रभाकरच्या आईने सांगितलं. प्रभाकर विवाहित आहे आणि त्याला दोन मुली आहेत. सध्या, काही कारणास्तव प्रभाकरची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. प्रभाकरची आई गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहे असे असूनही प्रभाकरने आपल्या आईला एकटे सोडले आहे. शेजारीच प्रभाकरच्या आईची काळजी घेत आहेत. प्रभाकरने केलेल्या आरोपाबद्दल त्याच्या आईला काहीच माहिती नाही.

साईल यांचे आरोप काय?

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

रंगेल राजाचे 5000 महिलांशी लैंगिक संबंध, फीमेल हार्मोन्स शरीरात सोडून राजाला केलं ‘शांत’!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.