AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा..वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने उचलली ही महत्वाची पाऊले…

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. त्यामध्येही जड वाहन्यांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. आता हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा..वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने उचलली ही महत्वाची पाऊले...
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. त्यामध्येही जड वाहन्यांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. आता हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. कारण सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर वाहन्यांच्या मोठ्या रांगा बघायला मिळतात. वाहतूक कोंडी दूर करताना पोलिसांना देखील नाकेनऊ येतात.

आता ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महावीर चौक चिंचवड ते बिर्ला हॉस्पीटल डांगे चौक, भुमकर चौक ते मारुंजी वाय जंक्शन या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना 15 डिसेंबरपासून सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ऊस वाहतूकीला नो एन्ट्री

या वाहनांमध्ये जास्त वजन असल्याने आणि ट्रॉली जोडल्याने ती संथगतीने जात असल्याने रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होवून वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ऊस वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार हे नक्की.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केली होती. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता.

संबंधित बातम्या : 

पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Sawai Gandharva Bhimsen Festival| यंदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फेब्रुवारी रंगणार ; कोरोना नियमांचे होणार पालन

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.