AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर पडू नका, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहा; ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन

ठाण्यात कालपासून (9 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain)

घराबाहेर पडू नका, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहा; ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 7:31 PM
Share

ठाणे : ठाण्यात कालपासून (9 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. एका ठिकाणी इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. यामुळे सोसायटीत उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain).

महापौर आणि आयुक्तांचं नागरिकांना आवाहन

ठाणे शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा, असं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain).

ठाण्याचे महापौर आणि आयुक्तांच्या नेमक्या सूचना काय?

1) नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. 2) पाऊस सुरु असताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी थांबावे. 3) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास विजेचे खांब आणि झाडाखाली उभे राहू नये तसेच आपली वाहने 4) रस्त्यावर झाडाखाली उभी न करता सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावीत. 5) पाऊस सुरु असतानास झाडाखाली असताना किंवा रस्त्यावर चालताना मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री नंबर जारी

दरम्यान, ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – १८०० २२२ १०८ आणि हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.