Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वोट जिहाद महाविकास आघाडीला भारी पडणार? नोमानींची माशी शिंकली; शेवटच्या क्षणी गेम पालटणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'वोट जिहाद' चा मुद्दा चर्चेत आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला 17 मागण्या केल्या असून, त्या मागण्या मुस्लिम समाजाच्या हिताच्या आहेत असा दावा करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्या उघड केल्या आहेत आणि यावरून महाविकास आघाडीवर निवडणुकीत प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. नोमानी यांच्या विरोधात तक्रारही दाखल झाली आहे. या वादाचा राज्यातील राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वोट जिहाद महाविकास आघाडीला भारी पडणार? नोमानींची माशी शिंकली; शेवटच्या क्षणी गेम पालटणार?
sajjad nomaniImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 5:15 PM

लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीतही वोट जिहादचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल असं चित्र होतं. सत्ताधारी आणि विरोधक विकासाच्या मुद्द्यावरून आमनेसामने येतील असंही दिसत होतं. पण निवडणूक प्रचाराच्या तोफा थंड होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच वोट जिहादच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड के प्रवक्ता सज्जाद नोमानी यांची निवडणुकीच्या राजकारणात एन्ट्री झाली. त्यांनी महाविकास आघाडीकडे 17 मागण्या केल्या. मुस्लिमांना महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन केलं आणि तिथेच माशी शिंकली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्या एक्सपोज केल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा वोट जिहादचा चेहरा उघडा झाला आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीला या निवडणुकीत फटका बसणार असल्याची चिन्हे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा वोट जिहाद उघड केला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड के प्रवक्ता सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला 17 मागण्या दिल्या होत्या. या सर्व मागण्या मुस्लिम धार्जिण्या आणि हिंदू विरोधी होत्या. त्या महाविकास आघाडीने मंजूरही केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधून नोमानी हे आघाडीला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. फडणवीस यांनी हा व्हिडीओही बाहेर काढला आणि राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. महाविकास आघाडी ठरवून विशिष्ट समाजाचं लांगूलचालन करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.

काय आहेत मागण्या?

मुस्लिम समाजाला 10 टक्के आरक्षण द्या, 2012 ते 2024 दरम्यान राज्यात जेवढ्या दंगली झाल्या. त्यातील मुस्लिमांविरोधातील खटले काढून घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला, आदी 17 मागण्या मुस्लिम उलेमांनी महाविकास आघाडीकडे अधिकृत पत्र देऊन केल्या आहेत. महाविकास आघाडीनेही अधिकृत पत्र देऊन या मागण्या मान्य केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यांना जर वोट जिहाद करायचं असेल, धर्माचं युद्ध करायचं असेल तर आपणही जागे झालं पाहिजे. आपण झोपता कामा नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सोमय्या यांची तक्रार

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. वोट जिहाद, मुस्लिम धर्मियांच्या भावना भडकावणे, द्वेषयुक्त भाषणे, ज्या मुस्लिमांनी भाजपचं समर्थन केलं, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालणे आदी आवाहने नोमानी यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महाविकास आघाडीला फटका बसणार

महाविकास आघाडीची प्रतिमा ही धर्मनिरपेक्ष आणि समतावादी अशी आहे. पण वोट जिहादचा मुद्दासमोर आल्याने महाविकास आघाडीची प्रतिमा डागाळली गेली आहे. विशिष्ट धर्माचं लांगूचालन होत असल्याचं भाजपने उघड केलं आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या आधी हिंदू मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. सज्जाद नोमानी यांचा कारनामा उघड झाल्यानंतर हिंदू मतदार महायुतीच्या मागे जाण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मुस्लिम बहुल परिसरात महाविकास आघाडीला फायदा होईल. पण हिंदू बहुसंख्य असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत.

राज्यात मुस्लिमांचा प्रभाव असणारी मतदारसंघ अत्यंत कमी आहेत. तुलनेने हिंदू मतांचा प्रभाव असणारे मतदारसंघ अधिक आहेत. अशा ठिकाणी हिंदू मते एकवटून भाजपच्या मागे जाताना दिसत आहेत. त्यातच लाडकी बहीण योजनेचा प्रभावही राज्यात आहे. या सर्वांचा परिपाक पाहता, राज्यात पुन्हा एकदा महायुतीला कौल जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा हिंदुत्ववादी नेते अशी होती. पण नोमानी यांचं प्रकरण उघड झाल्याने ठाकरेंचा हिंदू वोटर त्यांच्या पासून दुरावू शकतो. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांना मुंबई, संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि ठाण्यात सर्वाधिक बसू शकतो असं जाणकारांचं मत आहे.

मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्...
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्....
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.