महाविकास आघाडीच्या बैठकीतील सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाचा मुंबईतील 20 जागांवर दावा

महाविकास आघाडीच्या नेत्यांची वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे गटाने मोठा बॉम्ब टाकल्याचं कळतं. ठाकरे गटाने मुंबईतील सर्वाधिक जागा मागितल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या बैठकीतील सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाचा मुंबईतील 20 जागांवर दावा
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 6:18 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपाची चर्चा करण्यात येत असून बैठकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 20 जागांची मागणी केली आहे. ठाकरे गटाचा मुंबईतील असलेला बेस आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे 20 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत एका जागेवरून पेच निर्माण होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.

वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला आघाडीचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत ठाकरे गटाने आज बॉम्बच टाकला आहे. ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 20 जागांवर दावा सांगितला आहे. म्हणजेच ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ 16 जागा देण्यास तयार असल्याचं दिसून आलं आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत तीन जागांवर विजय मिळवला होता. एका जागेवर ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला होता. तर मुंबईत काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाला फक्त प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

म्हणून 20 जागा हव्यात?

2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत 16 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 14 तर काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या होत्या. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. त्यामुळे मुंबईत आपलंच वर्चस्व राहावं, असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. शिवाय मुंबई महापालिका निवडणूक विधानसभेनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील बेस पक्का करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्यानेच त्यांनी 20 जागा मागितल्या असाव्यात असं सांगितलं जात आहे.

अणुशक्तीनगर हवंय

या बैठकीत अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे. या मतदारसंघातून नवाब मलिक निवडून आले आहेत. पण मलिक सध्या हे अजितदादा गटात आहेत. त्यामुळे या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा सांगितला आहे. ही जागा सोडण्यास शरद पवार गट तयार नाहीये. पवार गटाला अणुशक्ती नगरमधून रवींद्र पवार यांना मैदानात उतरवायचे आहे. तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला या मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली होती. त्यामुळे ठाकरे गटाला ही जागा हवी आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

एका जागेची अदलाबदली?

दरम्यान, ठाकरे गटाने वांद्रेपूर्वेच्या जागेवर दावा सांगितल्याचं कळतं. वांद्रे पूर्वेची जागा काँग्रेसकडे आहे. पण ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्वेतून उभं करायचं आहे. त्यामुळे त्यांना ही जागा हवी आहे. त्याबदल्यात शिवसेनेची मूळची कांदिवलीची जागा सोडण्यासही ठाकरे गट तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.