AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले. राऊत आणि पवारांमध्येही जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.

संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?
संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 5:42 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला लावला आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले. राऊत आणि पवारांमध्येही जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, कोणत्याही राजकीय घडामोडी सुरु नसल्याचं म्हटलंय. (Sanjay Raut meet CM Uddhav Thackeray and Sharad Pawar, Opinions of political analysts)

संजय राऊत काय म्हणाले?

सहज भेटलो, काहीही घडामोडी नाहीत, मुख्यमंत्र्यांचा काही निरोप असेल तर तुम्हाला कशाला सांगू, पवार साहेबांना सांगेन, हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, उद्धव ठाकरे चांगलंकाम करत आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात या सरकारचं काम चालेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवरुन बाहेर आल्यानंतर दिली.

राजकीय विश्लेषकांच्या मते भेटीगाठीची कारणं कोणती?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लगेचच ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. म्हणजे संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊनच शरद पवार यांच्या भेटीला गेले हे तर नक्कीच आहे. पण त्यामागे महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे किंवा पवार आणि ठाकरे यांच्यात काही बेबनाव असेल असं नाही. तर पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं आहे. या अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे, प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र, त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने बजावलेलं समन्स, अनिल परब यांच्या अडचणीत झालेली वाढ, असे काही मुद्दे या भेटीगाठींमागे असून शकतात असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

‘महाविकास आघाडी सरकार टिकेल’

दुसरीकडे या भेटीगाठीचा सिलसिला म्हणजे महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, असं म्हणता येणार नाही. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचं म्हटलं होतं. तसंच महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत असल्याचं मत शरद पवार यांनी कालच व्यक्त केलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही महाविकास आघाडीमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचं म्हटलंय. तसंच सरकार 5 वर्षे टिकेल असा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, असं म्हणता येणार नसल्याचंही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दीड तास चर्चा, पण 20 मिनिटात पवारांची भेट घेऊन संजय राऊत परतले

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीत चाललंय काय?

Sanjay Raut meet CM Uddhav Thackeray and Sharad Pawar, Opinions of political analysts

'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.